ज्या देशाने स्त्रीला माता म्हणून गौरवली
लग्नानंतर नवरा गेला म्हणून मला जाळली
माझी व्यथा कुणालाच नाही का कळली?
पुढे समाज सुधारला .... देशही पुढारला
स्वतःला अहिंसावादी मानू लागला
स्वतःला अहिंसावादी मानू लागला
नवनवीन कल्पनांचा उदय झाला
आता नवराच मला जाळू लागला
आता नवराच मला जाळू लागला
समाज कधीकधी हळहळला
अधूनमधून टिपेही गळू लागला
अधूनमधून टिपेही गळू लागला
कुणी विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवला
पण अखेर वाहत्या वाऱ्यावर तोही विरला
पण अखेर वाहत्या वाऱ्यावर तोही विरला
शेवटी मीच निश्चय केला
लग्नाला ठाम नकार दिला
लग्नाला ठाम नकार दिला
आता मात्र हद्द झाली ... नकार दिला
.. म्हणूनही माझी राख झाली
.. म्हणूनही माझी राख झाली
तात्पर्य एव्हढेच कि ........
समाज सुधारला तरी छळणे काही संपले नाही
समाज सुधारला तरी छळणे काही संपले नाही
मी काहीही केले तरी जळणे काही संपले नाही
No comments:
Post a Comment